पंढरपूर शहरात पुन्हा संचारबंदी.....


२२ ते २६ नोव्हेंबर दरम्यान पंढरपूर ला येणारे सर्व बस राहणार बंद

पंढरपूर / प्रतिनिधि : कोरानाच्या प्रादुर्भावामुळे यावर्षीची चैञी, आषाढी याञा रद्द झाली. याच धर्तीवर कार्तिकी याञा देखील रद्द करण्याचा निर्णय शासन स्तरावर घेण्यात आला आहे.  यामुळे पंढरपूर शहरासह आसपासच्या ८ ते १० गावांमध्ये   २४ ते २६ नोव्हेंबर दरम्यान संचारबंदी लागु करण्यात येणार आहे.  याचबरोबर राज्यभरातुन पंढरपूर ला येणारे   सर्व बससेवा  २२ ते २६ नोव्हेंबर दरम्यान बंद ठेवण्याचा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवण्यात आला असल्याची माहिती अप्पर पोलीस अधिक्षक अतुल झेंडे यांनी पञकार परिषदेत दिली. 
  यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, पो नि अरुण पवार, पो नि किरण अवचर, पो नि प्रशांत भस्मे आदि उपस्थित होते.  कार्तिकी याञेसाठि पंढरपूर शहरात दिंड्या येवु नयेत यासाठी शासनाने बंदी घातली आहे.  पोलीस प्रशासनाच्यावतीने तिहेरी बंदोबस्त लावण्यात येणार आहे.  यासाठी १०० पोलीस अधिकारी, १२२१ पोलीस कर्मचारी, ४०० होमगार्ड, एक एसआर एफची तुकडी तैनात करण्यात येणार आहे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चक्क गोव्याची दारु वाखरीत......

गुरसाळे बंधारेत सापडला तरुणाचा मृतदेह

सांगोला तालुक्यातील वाळू माफियांवर पंढरपूर पोलीसांची कारवाई