पोस्ट्स

भीमा नदी, निरा उजवा कालवा काठचा वीज पुरवठा बंद ठेवावा : प्रांताधिकारी सचिन इथापे

इमेज
  पाण्याची चोरी आणि परिस्थितीवर देखरेख  ठेवण्यासाठी  पथकांची नियुक्ती                                                                                  पंढरपूर :- जिल्ह्यात यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने धरणातील पाण्याची पातळी कमी झाली आहे. उजनी धरणासह इतर साठ्यातील पाणी पिण्यासाठी राखीव ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.  सोलापूर शहरासाठी पिण्याकरीता उजनी धरणातून पाणी सोडण्यात आले आहे. तसेच निरा उजवा कालव्यातून  पाणी सोडण्यात आलेले आहे. हे पाणी पिण्यासाठी राखीव राहावे यासाठी भीमा नदी व निरा उजवा कालवा काठचा वीजपुरवठा बंद ठेवावा अशा सूचना प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी दिल्या  तसेच पाण्याची चोरी आणि परिस्थितीवर देखरेख ठेवण्यासाठी  पथकांची नियुक्ती केली  असल्याचेही त्यांनी सांगितले.               पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क असून, संभाव्य पाणी टंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनाकडून आवश्यक उपाय योजना करण्यात येत आहेत. सोलापूर शहरासाठी पिण्याकरिता उजनी धरणातून पाणी सोडण्यात आले आहे. तसेच निरा उजवा कालव्यातून पाणी सोडण्यात आले आहे. या काळात भीमा नदी व निरा उजवा कालवा काठच

डॉल्बीच्या कारणावरून पोलीस अधिकाऱ्यांवर हल्ला : पाणीवेसच्या 15 कार्यकर्त्यांची मुक्तता

इमेज
  अँड . शशी कुलकर्णी सोलापूर / प्रतिनिधी :  येथील (पाणीवेस) दत्त चौक भागातील कार्यकर्ते लक्ष्मीकांत उर्फ सागर सुभाष सिरसट, निलेश शंकर काटकर, सुरज रमेश पवार, गणेश मोहन पवार, तुषार बंडोबा पवार,आकाश शिवशंकर चाटी, विक्की उर्फ उमाकांत शिवशंकर चाटी, ज्ञानेश्वर विलास कोटमळे, किसन किसन गडदूर, शुभम राजशेखर वागदुर्गी, प्रसाद पांडुरंग पवार, भाऊकांत शहाजी पवार(जाधव), रोहित सुभाष सातपुते, अभिजीत विजयकुमार हविनाळ, निखिल सुनिल भोसले या सर्वांनी डॉल्बी व नाचगाणे बंद करण्याच्या कारणावरुन, पोलीस अधिकाऱ्यांशी हुज्जत घालून त्यांच्यावर हल्ला करून मारहाण केल्याचे आरोपातून सोलापूर येथील अति. सत्र न्यायाधीश योगेश राणे साहेब यांनी सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. यात हकीकत अशी की, दि ६ जानेवारी २०१५ रोजी पोलीसांना डोणगांव रोडवरील एका फार्म हाऊसवर डॉल्बीचा आवाज ऐकू आल्याने रात्र गस्तीवर असणारे कर्मचारी/ पोलीस उपनिरिक्षक विश्वास भाबड व त्यांचे इतर सहाय्यक कर्मचारी वानकर फार्म हाऊसवर गेले. तेथे त्यांना अंदाजे २० ते २५ तरुण डॉल्बीवर मद्यधुंद अवस्थेत नाचत असताना आढळून आले. त्यांना डॉल्बी बंद करण्यास सांगितले

गुरसाळे बंधारेत सापडला तरुणाचा मृतदेह

इमेज
  गुरसाळे बंधारेवर मयताची पाहणी करताना पो नि मिलींद पाटील, सपोनि ओलेकर  पंढरपूर / प्रतिनिधी :   गुरसाळे ता पंढरपूर येथील बंधारेत  पुरुष जातीचे प्रेत वय अंदाजे वय 35 -40 वर्षे सडलेल्या अवस्थेत दिनांक 19 आँक्टोबर  रोजी सकाळी 10 वाजता  मिळून आले आहे. यामुळे एकच खळबळ उडाली असून पंढरपूर तालुका पोलीस सदर मयताची ओळख पटवणेसाठी अधिक तपास करीत आहेत.   आमचेकडे सर्व प्रकारचे गाड्या योग्य दरात भाड्याने मिळतील :  +919503093385  सदर मयताच्या डाव्या हाताचे पोटरीवर मराठीत 'शीतल' व उजव्या हाताचे पोटरीवर मराठीत  'आश्विनी' व  बदाम  आकारामध्ये 'माँ ' असे गोंदलेले आहे .  मयताचे हातावरील गोंदलेले नाव त्याचबरोबर त्याचे अंगात पिस्ता रंगाचा शर्ट असून कॉलरचे आतील बाजूस  Cruze India असे लेबल असलेला शर्ट व निळ्या- राखाडे रंगाची  अंडरविअर खिशात लाल रंगाची तंबाखूचा बटवा आहे.  सदर मयताचे  वय अंदाजे 35 - 40 वर्ष असून  उंची अंदाजे 5 फुट 6 इंच आहे.  तरी वरील वर्णनाचे मयत व्यक्ती बाबत माहिती मिळाल्यास पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यास संपर्क करणेचे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे .    पो नि मिलिंद पाटी

अवैध वाळू साठ्यावर महसूल प्रशासनाची कारवाई

इमेज
  10 ब्रास वाळू साठा, 4 लाख 57 हजारांचा मुद्देमाल जप्त पंढरपूर :-  अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूकी  विरोधात  पंढरपूरच्या महसूल विभागाने प्रांताधिकारी गजानन गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली धडक मोहीम हाती घेतली आहे. महसूल विभागाच्या  भरारी पथकाव्दारे कासेगांव (ता.पंढरपूर) येथे  अवैध  वाळू साठ्यावर  धडक कारवाई  केली असून, त्यामध्ये  10 ब्रास वाळू  व 4 लाख 57 हजारांचा मुद्देमाल  जप्त करण्यात आला आहे. पंढरपूर तालुक्यातील अवैध गौण खनिज उत्खनन रोखण्यासह वाळूची अवैध वाहतूक व साठा करणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी प्रांताधिकारी गजानन गुरव व तहसिलदार सुशिल बेल्हेकर यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथकांची नेमणूक केली आहे. अवैध गौण खनिज विरोधी पथकाने मौजे कासेगाव येथील गट नंबर 27/ 1अ  येथे अचानक भेट दिली  असता,  सदर ठिकाणी गणेश मनोहर गंगथडे व चैतन्य मनोहर गंगथडे यांच्या  नावे असलेल्या गट नंबर 27/ 1अ  मध्ये 10  ब्रास  अवैधरित्या वाळूसाठा  केलेला दिसून आला. तसेच सदर वाळू साठ्याच्या ठिकाणी एमएच 11 एजी 2274 या क्रमांकाचा वाळूसाठी वापरण्यात येणारे पिकअप हे वाहन दिसून आले. तसेच वाहनामध्ये  वाळू भरण्यासा

चक्क गोव्याची दारु वाखरीत......

इमेज
राज्य उत्पादन शुल्कची कारवाई    पंढरपूर / प्रतिनिधी : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पंढरपूरच्या पथकाने बुधवारी (ता. 21) वाखरी गावाच्या हद्दीत एका पिकअप वाहनातून दीड लाखाची गोवा राज्य निर्मित विदेशी दारु जप्त केली.    राज्य उत्पादन शुल्क पंढरपूर विभागाचे निरिक्षक किरण बिरादार यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे त्यांनी बुधवारी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास वाखरी (ता. पंढरपूर) गावाच्या हद्दीत वाखरी-गादेगाव रोडवर सापळा रचून  अशोक लेलॅंड कंपनीच्या चारचाकी पिकअप वाहन क्र MH 42 BF 2671 चा पाठलाग केला असता वाहनचालक गाडी सोडून फरार झाला. निरिक्षक पंढरपूर यांनी सदर वाहनाची झडती घेतली असता जनावराच्या चाऱ्याआड विदेशी दारूच्या पेट्या लपवून ठेवल्याचे दिसून आले. वाहनात 25 कागदी बाॅक्समध्ये गोवा राज्य निर्मित व विक्रीसाठी असलेल्या एड्रीयल क्लासिक व्हिस्कीच्या 750 मिलीच्या 300 सीलबंद बाटल्या आढळून आल्याने महाराष्ट्र दारुबंदी कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून फरार आरोपीचा शोध घेण्यात येत आहे. या गुन्ह्यात एक लाख छप्पन हजार किंमतीची दारु व पिकअप वाहन असा एकूण नऊ लाख सहा हजार किंमतीचा मुद्देमा

उपरीतील दत्तात्रय नागणे यांचे अभिजीत पाटील गटात प्रवेश

इमेज
    प्रतिनिधी पंढरपूर /- सहकार शिरोमणी वसंतराव सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीचे बिगूल वाजल्याने श्री विठ्ठल सह.साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांचा भाळवणी गटामध्ये उपरी गाव भेट दौरा असताना उपरीचे माजी सरपंच दत्तात्रय माणिकराव नागणे यांनी अभिजीत पाटील गटात जाहीर प्रवेश केला. एकेकाळी भालके व काळे गटात प्रामाणिकपणे काम केलेल्या सहकाऱ्याला आज अभिजीत पाटलांची ओढ लागलेने  कारखाना निवडणुकीत रंगत वाढली आहे.  सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना काळे भालके गटाचे पदाधिकारी सत्ताधाऱ्यांच्या कामावर नाराज होऊन आमच्याकडे येत आहेत. विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या विश्वासावर सभासदांनी विश्वास ठेवला असून त्यांना चांगला ऊस दर देता आला त्याच पद्धतीने सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखाने देखील विठ्ठल प्रमाणे ऊसदर देण्यात येईल असे अभिजीत पाटील यांनी सांगितले. यापुढे विठ्ठल प्रमाणे सहकार शिरोमणी ला दर दिला जाईल या अनुषंगाने काळे भालके गटातील अनेक पदाधिकारी अभिजीत पाटील गटात येण्यास उत्सुक आहेत अशी सर्वत्र चर्चा तालुक्यात होताना

वादळी वा-याने विठ्ठल कारखान्याचे सुमारे ३ कोटींचे नुकसान

इमेज
  पंढरपूर / प्रतिनिधी :   वेणुनगर - गुरसाळे येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे सोमवारी अचानक वादळी वारे व अवकाळी पा ऊसामुळे कारखान्याचे मालमत्तेचे सुमारे अडीच ते तीन कोटी रुपयांचे  नुकसान झालेची माहिती कार्यकारी संचालक गायकवाड यांनी प्रसिध्दीपञकाद्वारे दिली आहे. कारखान्याचे कर्मचारी यांचे मोटार सायकल पार्कंग शेडवर झाड कोसळल्याने कर्मचाऱ्यांच्या मोटार सायकलचे नुकसान झालेले आहे.  सभासद साखर वाटप दुकानावरील लोखंडी पत्रे वादळी वाऱ्यामुळे उडून जावून सभासदांना वाटून शिल्लक राहिलेली अंदाजे ३० ते ३३ क्विंटल साखर भिजलेली आहे. तसेच त्याचे शेजारी कामगार पतसंस्थेवरील संपूर्ण पत्रे उडून झेरॉक्स मशिन व कॉम्प्युटर व पतसंस्थेचे रेकॉर्ड भिजलेले असून व इतर साहित्याचेही मोठ्या प्रमाणात नुकसान  झालेले आहे.  विठ्ठल प्रशालेतील विद्यार्थी व स्टाफसाठी तयार केलेले सायकल व मोटार सायकल पार्कंग शेड वाऱ्यामुळे पुर्ण पडलेले आहे.  कारखान्याचे साखर गोडावून नंबर १६ व १७ वरील सिमेंटचे संपुर्ण पत्रे उडून गेलेने नुकसान झालेले आहे. आर.ओ. प्लॅन्टवरील नवीन पत्रे उडून गेलेले आहेत. इंजिनिअरींग ऑफीस, शुगर हाऊस, टबाईन,

अखेर कल्याणराव काळे, डाँ बी. पी. रोंगे, अँड दीपक पवार यांच्या अर्जावरील निकाल जाहीर

इमेज
  पंढरपूर / प्रतिनिधी :  भाळवणी ता पंढरपूर येथील वसंतदादा काळे सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची रंगत वाढली आहे.  प्रमुख नेत्यांच्या उमेदवारी अर्जावरच आक्षेप घेतलेने  प्रमुख नेत्यांची धाकधुक वाढली होती. अखेर आज सोमवारी  निवडणुक निर्णय अधिका-यांनी निकाल जाहीर केला असून  कल्याणराव काळे, डाँ बी. पी. रोंगे, अँड दीपक पवार यांचे उमेदवारी अर्ज मंजूर केले आहेत. यामुळे ही निवडणुक चुरशीने होणार असल्याचे स्पष्ट होत आहे. संचालक योगेश ताड यांनी बी पी रोंगे यांच्यावर भागाच्या प्रमाणात ऊस गाळपास आला नसल्याचा आक्षेप घेतला होता तर धनंजय काळे यांनी चेअरमन कल्याणराव काळे हे विठ्ठल कारखान्याचे थकबाकीदार असल्याचा आक्षेप घेतला होता. तर दिपक पवार यांनी देखील भागाच्या प्रमाणात ऊस  गाळपास आला नसल्याचा आक्षेप होता. अखेर या प्रमुख उमेदवारांवरील हरकती फेटाळण्यात आल्या असून उमेदवारी अर्ज मंजूर केले आहेत.

घरात घुसून महिलेचा विनयभंग व तिच्या पतीस गंभीर जखमी केल्याप्रकरणी आरोपीला शिक्षा

इमेज
  पंढरपूर/ प्रतिनिधि : घरात  टी.व्ही. पाहत असताना आरोपी  शहाजी भिमराव गायकवाड रा. करोळे ता. पंढरपूर याने घरात घुसून  फिर्यादीस तु मला फार आवडते असे म्हणुन  फिर्यादीस मनास लज्जा वाटेल असे कृत्य करीत विनयभंग केला. त्यावेळी फिर्यादीचा पती तेथे आला असता त्यांना शिवीगाळी, दमदाटी करून आरोपीने त्याचे हातातील ऊस तोडणीचे कोयत्याने फिर्यादीच्या डावे हातावर व उजवे पायाचे गुडघ्यावर मारून किरकोळ व गंभीर  जखमी केले. याप्रकरणी पंढरपूर येथील  प्रथमवर्ग न्यायादंडाधिकारी श्रीमती आर. जे. कुंभार यांनी आरोपीस  सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. याप्रकरणी करकंब पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात  भा.द.वि.कलम  ३२६, ३५४, ३५४अ, ४५२, ३२४,५०४,५०६ शस्त्र अधिनियम ४,२५ सह महा. पो.अधि. कलम १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.   सदर गुन्हयाचा तपास करून पोलीस हेड कॉ./ बी.के. मोरे यांनी  यातील आरोपी विरूध्द मा. कोर्टात दोषारोपपत्र दाखल केले होते. सदर खटल्यात सरकारी वकील  एम. एम. पठाण यांनी सरकार पक्षातर्फे ८  साक्षीदार तपासले आहेत. सदर साक्षीदारांचे जवाब व सरकारी वकिलांचा युक्तीवाद ग्राहय धरून  न्यायालयाने आरोपीस भा.द.

रेशन दुकानातून मिळणार मोफत धान्य : तहसिलदार सुशील बेल्हेकर

इमेज
      पंढरपूर :-  राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या माध्यमातून पात्र रेशन कार्डधारकांना वर्षभर मोफत धान्य उपलब्ध होणार आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत तालुक्यातील 1 लाख 52 हजार 727 नागरिकांना जानेवारीपासून मोफत धान्य वितरण केले जात आहे. यासाठी महिन्याला तालुक्यात सुमारे 353 टन गहू व 516  टन तांदूळ असे एकत्रित 869 टन धान्य वाटप करावे लागणार असल्याची माहिती तहसिलदार सुशिल बेल्हेकर यांनी दिली. पंढरपूर तालुक्यात ग्रामीणमध्ये 116 तर शहरात 30  असे एकूण 146 रेशन दुकान आहेत. अंत्योदय योजनेत 5 हजार 713 कार्डधारक असून 21 हजार 506 लोकसंख्या आहे. तर अन्नसुरक्षा योजनेत 32 हजार 701 कार्डधारक असून 1 लाख 31 हजार 221 लोकसंख्या आहे. राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम 2013  अंतर्गत अंत्योदय कार्डधारकास  प्रतीकार्ड 15 किलो गहू 2 रुपये किलो दराने व 20 किलो तांदूळ 3 रुपये किलो दराने अंत्योदय कार्डधारकास दिले जात होते. तसेच अन्नसुरक्षा योजनेत प्रतिव्यक्ती 2 किलो गहू 2 रुपये दराने व 3 किलो तांदूळ 3 रुपये किलो दराने दिले जात होते. जानेवारी 2023 पासून अंत्योद्य योजनेतील  प्रत्येक कार्डधारकाला 15 किलो गहू 20 क